Sunday, March 13, 2022

2

 शेरात सर्वनामांचा अतिरेक झाला की कवीची वृत्तपूर्तीसाठी धडपड सुरू आहे हे सहज लक्षात येते. विशेषत: अक्षरगणांमध्ये हे होताना दिसते. 


ही गोष्ट शब्दयोगी / उभयान्वयी अव्ययांच्या बाबतीतही लागू होते. एकाच शेरात अनेक अव्यये घुसडली की शेर निर्रथक वाटू लागतो.

हा क्राफ्टचा भाग आहे, बारिक मुद्दा आहे - आणि ह्यात बरेच प्रसिघ्द कवी फसलेले मी पाहिले आहेत. अशा गझलाना मी गमतीने सर्वनामी गझला म्हणतो 🙂.

सर्वनाम म्हणजे काय, अव्यये काय आहेत हे बघितल पाहिजे. शिवाय शब्दांशी विशेष जवळीक असलेली बरी..जुने शब्द कुठले होते, काय वेगवेगळ्या अर्थच्छटा निघून येतात हे बघण चांगल्या कवीच्या मशागतीचा भाग असतो.

अमूक शब्दाची व्याकरणातली संज्ञा काय आहे हे माहिती असावेच असा नियम नाही, पण आशय मांडताना शब्दांची गफलत होते आहे हे लक्षात येण तेवढ कठीण नाही.

मीर आणि गालिब जेवढे मोठे कवी होते, तितकेच ते भाषेचे अभ्यासक देखील होते, शेरांचा अनेक अंगाने विचार करणारे होते. 

एकूण चांगले शेर आकाशातून पडत नाहीत, ते लिहावे लागतात ! 

(ह्या नोंदीचा टोन उपदेशात्मक वाटल्यास क्षमस्व.)

ता. क. - व्याकरणाचे काम नुसते नियम बनवण्याचे नसून संज्ञा ठरवण्याचे, दिशा दाखवण्याचे देखील आहे. बोलीभाषेला देखील स्वत:चे असे अलिखित व्याकरण असतेच. व्याकरण हे साधन (means to an end) आहे, त्याचा द्वेष नको. तिथल्या नको त्या गोष्टी दूर करता येवू शकतात - उदाहरणार्थ नको तिथ अनावश्यक अनुस्वार देण मला योग्य वाटत नाही आणि माझ्यापुरत ते मी बंद केलेल आहे. 

__

अनंत ढवळे

No comments:

नदी, दिवे, शहर

हे शहर उभारलं गेलं होतं  नदीच्या काठालगत  तिच्या वळणांलगत शहराचे दिवे तरंगतात  नदीच्या निळसर करड्या पाण्यावर अस्ताव्यस्त भिरकावून दिलेल्या त...