Monday, June 21, 2010

चळवळींची भ्रामकता :

मराठी गझलेच्या नावाखाली आजवर अनेक चळवळी सुरू झाल्या आणि संपल्याही. या चळवळींमधून फारसं चांगल असं काही बाहेर पडलं नाही तरी मराठी गझलेचा प्रवाह मात्र वाहता राहिला. मला वाटतं एवढ श्रेय या चळवळींना दिलंच पाहिजे. मी औरंगाबदेत असताना मराठवाडा गझल प्रतिष्ठान नावाची एक हौशी संस्था मी आणि माझे काही कवी मित्र चालवत असू. ही चळवळ अर्थातच बिनपैशांची चळवळ होती. औरंगाबाद आणि आसपासच्या परिसरातील मराठी- उर्दू कवींना एकत्र आणण्याचे काम या चळवळीने चोख पार पडले. पुढे मुंबईच्या एका संस्थेने औरंगाबादेत एक गझल संमेलन घेतलं. मगप्र चा या संमेलनासाठी आर्थिक नसला तरी नैतिक आणि सांस्कृतिक आधार होताच. मी या सर्व कार्यक्रमांमधून हिरिरिने सहभागी होत होतो.. नंतर कधीतरी असं जाणवलं की या चळवळींमधून फार काही साधणार नाहीए..शिवाय रा.ग. जाधवांचा'चळवळींचे साहित्य ' हा लेख वाचनात आला...साहित्यविषयक गंभीर भूमिका बाळगणार्‍यांनी हा लेख अवश्य वाचावा..

No comments:

सिनिकल माणसाचं इतिवृत्त

तुम्ही जगता - मौजमजा करता  मग यथावकाश मरता तुमच्या जागी दुसर कुणीतरी येत जग सुरू राहात काहीही बदलत नाही काहीही बदलणार नाही काही बदलण अपेक्षि...