स्वत:ची अशी काही बरीवाईट मूल्यव्यवस्था असेल तर माणसे त्या मूल्यव्यवस्थेच्या ढासळण्याबद्दल चिंतित होतात - पण आपली सगळीच्या सगळी मूल्ये धोक्यात आहेत असे त्यांना जेंव्हा वाटू लागते तेंव्हा मात्र त्यांच्या मनात वैयक्तिक अथवा सामाजिक संकटाची पुरेपूर जाणीव निर्माण होते . मग लोक चिडतात आणि संघर्ष करू लागतात . यामागे केवळ मूल्यव्यवस्थेचे ढासळणे नसून भीती अथवा धोक्याची भावना देखील असते.
आपली मूल्ये कुठल्याही अडचणीत नसण्याची जाणीव माणसांना स्थैर्य अथवा सगळं काही आलबेल असण्याचा अनुभव देते.
पण अशी काही मूल्येच नसतील (किंवा ती असलीत तरी त्यांची जाणीव नसेल) आणि काही धोका वाटत नसेल तर घटनांकडे सपशेल दुर्लक्ष केले जाते.
आपली अशी काही मूल्ये आहेत अशी जाणीव नसेल पण भीती अथवा धोक्याची भावना असेल - तर लोक अस्वस्थ होतात. जे होतय ते बरं नाही अशी काही अस्फुट भीती वाटू लागते.
समाजातले बहुतेक घटक काळात यातल्या कुठल्या न कुठल्या अवस्थेतून जात असावेत असे वाटते. आपल्यासभोती घडणाऱ्या घटनांवर ज्या काही प्रतिक्रिया येतात त्या समजून घेण्यासाठी ही मांडणी तशी उपयोगी आहे.
( द सोशियोलॉजिकल इमॅजिनेशन या पुस्तकात ही रचना आलेली आहे. समजण्यात अथवा पुनर्मांडणी करण्यात काही घोळ झाले असतील तर ते माझे आहेत. )